माडगूळकर राजस्थानात एवढं हिंडले, त्यावर सुंदर पुस्तक लिहायचं, त्यात त्यांनीच चितारलेली चित्रं, स्केचेस असं टाकून सजवायचं असं त्यांनी ठरवलं होतं. पण, पुण्यात आल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलं, एक चांगलं पुस्तक त्यांच्या मनातच राहिलं, काळाच्या ओघात विरून गेलं, अशी खंत त्यांनी प्रकट केली आहे.
माडगूळकरांना फ्लेमिंगोंसाठी राजस्थान गाठलं होतं. जर त्यांनी मुंबई सोडली नसती तर या निसर्गवेडय़ा लेखकाला इथल्या शिवडीच्या दलदलीत, फार तर उरण खाडीपट्टय़ात फ्लेमिंगो पाहायला मिळाले असते, असं मला आता फार वाटतंय.
जाता जाता - राजस्थानला आम्ही गेलो होतो ते केवळ भरतपूरसाठी. योगायोगाने डॉ. सलीम अलींना सायकल रिक्षातून फिरवणाऱया नंबर वन सायकल रिक्षातच बसून दिवसभर पक्षी ऐकले, पाहिले, तृप्त झालो. 2001मध्ये फ्लेमिंगो तर मी ठाण्यात अगदी माझ्या घराच्या अंगणात म्हणावे इतके जवळून पाहिले होते. 2001मध्ये ठाण्यात कोपरीतील मिठागर परिसरात आमची सोसायटी उभी राहिली, कंम्पाउंड वॉल तयार व्हायचीच होती, सर्पकुळ त्यांची वहिवाट सोडायला तयार नव्हतं, समोर तेव्हा मीठ उत्पादन होत होतं, पावसाळ्यात मीठासाठी तयार केलेली खाचरं, तळी भरून जायची आणि फ्लेमिंगोंसह कितीतरी पाहुणे पक्षी आमच्या समोर मुक्कामाला यायचे. अक्षरशः काही हातांवरून मी तेव्हा लागोपाठ दोन वर्षे गुलाबी गळा-मानेचे फ्लेमिंगो पाहिले होते. नंतरच्या वर्षी ते जरा दूर गेले आणि आताशा येतच नाहीत. आता त्यांचं तळंही कुठं राहिलयं म्हणा....
आज पहिल्यांदाच तुमचा ब्लॉग वाचला. डिझाईन छान निवडलय. लेखासोबतचे फोटो, चित्रे उत्तम दर्जाची असल्याने डोळ्यांना छान वाटतं. लेबल्स थोडी वाढवलीत तर वाचकांसाठी आणखी बरं पडेल. शुभेच्छा.. - माधव शिरवळकर
ReplyDelete